Amar Habib
लातूरपासून काही कि.मी. अंतरावरील हसेगाव. या गावाच्या शिवारात रवी बापटले या तरुणाने एच आय व्ही असणा-या मुलांचा आश्रम सुरु केलाय . या आश्रमात मुले आणि मुली मिळून ३२ जण राहातात. पहिली पासून १२ वी पर्यंतची म्हणजे ६ वर्षापासून १६-१७ वर्षा पर्यंतची मुले येथे आहेत. एका शेतक-याने जमीन दान दिली, परिसरातील काहीनी पालकत्व स्वीकारले, काहीनी आर्थिक मदत केली, आमदार- खासदार फंडातून काही बांधकाम झाले असलेतरी या प्रकल्पाला सरकारी अनुदान नाही. लोक पुढे येतात. तेच मदत करतात. रवी बापटले याचे समर्पण ही या प्रकल्पाची प्रेरणा आहे. रवीने सर्वस्व अर्पण केले आहे. तो पांढरी कफनी, पांढरा सदरा आणि पांढरा गमछा लेवतो, तो पत्रकारितेची नोकरी करीत होता. ती त्याने सोडली. लग्न न करण्याचा निर्णय केला. याच आश्रमात तो राहतो. अलीकडे रणजीत आणि विद्या हे जोडपे येथे येवून राहिले आहे...ते रवीच्या कामाला हातभार लावतात. आणखीनही एक दोनजण आहेत. सगळे विना पगारी..
'२६ जानेवारीला काही पत्रकार येणार आहेत, तुम्ही येऊ शकाल का?' रवीने विचारले, मला जेथे 'नाही' म्हणता येत नाही, अशा ठिकाणा पैकी सेवालाय हे एक असल्यामुळे मी 'येतो' म्हणालो. रवी बापटलेने पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर पहिली नौकरी 'संचार' दैनिकात केली होती. त्यावेळेस संजय अवटे संपादक होते. रवीच्या नेमणूक पत्रावर संजय अवटे यांची सही. त्यामुळे संजयला रवी आपला गुरु मानतो. आपला गुरु येतोय म्हटल्यावर रवीने त्यांचा सत्कार ठेवला व त्या निमित्ताने काही पत्रकार मित्राना आमंत्रित केले. शरद कारखानीस हे एकमतचे संपादक. सेवालयाशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध. अतुल देऊळगावकर, महारुद्र मंगनाळे, विजय स्वामी, अनिल पौलकर, जगताप, चान्नावीर असे सगळेच मित्र या निमिताने एकत्र जमले.
सेवालायातील मुलांनी पाहुणे पत्रकाराना बालतरु भेट देऊन त्यांच्याशी दोस्ती केली.
आपण या कामाकडे कसे वळलो हे रवी बापटले यांनी सांगितले. 'समोर जीवन असताना ते पाहून जगणे आणि समोर मृत्यू असताना ते पाहून जगणे यात खूप फरक पडतो.' अशी सुरुवातच चर्र करणारी होती. रवी वक्ता नाही. पण त्यांच्या शब्दाला तपश्चर्येचा गंध असल्यामुळे ते शब्द हृदयाचा ठाव घेतात. पण राणीचे शब्द मात्र हेलावून सोडतात. पुण्याजवळची ही मुलगी. आता १२ वीत आहे. तिला आम्ही अंबाजोगाईला झालेल्या लेखिका साहित्य संमेलनात बोलविले होते. ती आत्मकथन करते तेंव्हा संपूर्ण सभाग्रह अक्षरश: रडताना मी पाहिले होते. आजही ती बोलली... शब्दातून व्यक्त होणारी वेदना काय असते ते ती बोलताना अनुभवायला मिळते. अतुल देऊळगावकर यांनी प्रामाणिक माणसाच्या मनावर उमटणारे पडसाद व्यक्त केले. शरद कारखानीस यांनी मात्र मोठा आशावाद व्यक्त केला, जगात सुरु असलेल्या एच आय वी वरील संशोधनाचा आढावा घेऊन ते म्हणाले, येत्या ५-७ वर्षात या रोगावर उपचार निघेल. सारे जग त्या क्षणाची वाट पाहात आहे. आपण या मुलांची त्या क्षणाशी गाठ घालून द्यायची आहे.' संजय आवटे यांनी पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी या विषयावर 'प्रकट चिंतन' केले. ते म्हणाले, 'अंधाराचा गाजावाजा होतो, प्रकाशपुंज शांत असतात. असे प्रकाशपुंज पत्रकारितेतही आहेत.' रवी बापटले यांच्या सोबत केलेल्या कामाच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.
ही बैठक चालू असताना मला याचे मोठे समाधान वाटत होते कि, ' चांगुलपणा आता अनाथ नाही. ' रवी बापटले सारखे लोक जेंव्हा पुढे येतात, तेंव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहाणारे लोकही समाजात सक्रिय होत असतात. रवीने काम सुरु केले तेंव्हा त्याच्या मित्रात पत्रकारात महारुद्र मंगनाले आघाडीवर होते. अलीकडे शरद कारखानीससारखे अनुभवी पत्रकार सहकार्य करू लागले... आज संजय, अतुल सारखे नव्या दमाचे पत्रकार पुढे आले.
२६ जानेवारी रोजी लोकशाहीच्या चौथ्या खाम्बाने काय करावे? याचा या ठिकाणी वस्तुपाठ मिळाला.
पहिले पाउल..
पत्रकार आले. चांगले चांगले बोलले. सुंदर विचार मांडले आणि निघून गेले. एवढेच झाले असते तर त्याचे फारसे कौतुक करण्याचे कारण नव्हते. या पत्रकारानी एक पाउल पुढे टाकले म्हणून ते अभिनंदनास पात्र आहेत.
या आश्रमातील एका मुलाचा महिना खर्च १५०० रुपये आहे. १५०० रुपये महिना नियमित देणा-यास पालक म्हटले जाते. या पत्रकारापैकी चौघांनी पालकत्व पत्करले. संजय आवटे (कृषीवल), अनिल पौलकर (दिव्य मराठी) गाथाची आई स्मिता (मिळून सा-या जणी ) आणि सचिन चौधरी (छायाचित्रकार) या चौघांनी ही जबाबदारी घेतली. दर २६ जानेवारी रोजी सेवालायात जमायचे. पत्रकारांची कार्यशाळा घ्यायची आणि सामाजिक जाणीव ठेवून लेखन केलेल्या पत्रकाराना पुरस्कार द्यायचा, असे निर्णय करण्यात आले. पुरस्काराच्या भानगडीत न पडता पत्रकारानी या कामाशी लोकाना जोडून देण्याचे काम केले तर ते हवे आहे. त्याही पेक्षा या कामातून जे प्रश्न निर्माण होतात त्या विषयी समाजाचे प्रभावी प्रबोधन करण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे.
चार पत्रकारांनी जबाबदारी स्वीकारून कामाची सुरुवात केली आहे. या ता-यांच्या प्रकाशाने सारे आसमंत उजळो ही शुभेछा
Amar Habib (Senior Reporter)
'२६ जानेवारीला काही पत्रकार येणार आहेत, तुम्ही येऊ शकाल का?' रवीने विचारले, मला जेथे 'नाही' म्हणता येत नाही, अशा ठिकाणा पैकी सेवालाय हे एक असल्यामुळे मी 'येतो' म्हणालो. रवी बापटलेने पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर पहिली नौकरी 'संचार' दैनिकात केली होती. त्यावेळेस संजय अवटे संपादक होते. रवीच्या नेमणूक पत्रावर संजय अवटे यांची सही. त्यामुळे संजयला रवी आपला गुरु मानतो. आपला गुरु येतोय म्हटल्यावर रवीने त्यांचा सत्कार ठेवला व त्या निमित्ताने काही पत्रकार मित्राना आमंत्रित केले. शरद कारखानीस हे एकमतचे संपादक. सेवालयाशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध. अतुल देऊळगावकर, महारुद्र मंगनाळे, विजय स्वामी, अनिल पौलकर, जगताप, चान्नावीर असे सगळेच मित्र या निमिताने एकत्र जमले.
सेवालायातील मुलांनी पाहुणे पत्रकाराना बालतरु भेट देऊन त्यांच्याशी दोस्ती केली.
आपण या कामाकडे कसे वळलो हे रवी बापटले यांनी सांगितले. 'समोर जीवन असताना ते पाहून जगणे आणि समोर मृत्यू असताना ते पाहून जगणे यात खूप फरक पडतो.' अशी सुरुवातच चर्र करणारी होती. रवी वक्ता नाही. पण त्यांच्या शब्दाला तपश्चर्येचा गंध असल्यामुळे ते शब्द हृदयाचा ठाव घेतात. पण राणीचे शब्द मात्र हेलावून सोडतात. पुण्याजवळची ही मुलगी. आता १२ वीत आहे. तिला आम्ही अंबाजोगाईला झालेल्या लेखिका साहित्य संमेलनात बोलविले होते. ती आत्मकथन करते तेंव्हा संपूर्ण सभाग्रह अक्षरश: रडताना मी पाहिले होते. आजही ती बोलली... शब्दातून व्यक्त होणारी वेदना काय असते ते ती बोलताना अनुभवायला मिळते. अतुल देऊळगावकर यांनी प्रामाणिक माणसाच्या मनावर उमटणारे पडसाद व्यक्त केले. शरद कारखानीस यांनी मात्र मोठा आशावाद व्यक्त केला, जगात सुरु असलेल्या एच आय वी वरील संशोधनाचा आढावा घेऊन ते म्हणाले, येत्या ५-७ वर्षात या रोगावर उपचार निघेल. सारे जग त्या क्षणाची वाट पाहात आहे. आपण या मुलांची त्या क्षणाशी गाठ घालून द्यायची आहे.' संजय आवटे यांनी पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी या विषयावर 'प्रकट चिंतन' केले. ते म्हणाले, 'अंधाराचा गाजावाजा होतो, प्रकाशपुंज शांत असतात. असे प्रकाशपुंज पत्रकारितेतही आहेत.' रवी बापटले यांच्या सोबत केलेल्या कामाच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.
ही बैठक चालू असताना मला याचे मोठे समाधान वाटत होते कि, ' चांगुलपणा आता अनाथ नाही. ' रवी बापटले सारखे लोक जेंव्हा पुढे येतात, तेंव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहाणारे लोकही समाजात सक्रिय होत असतात. रवीने काम सुरु केले तेंव्हा त्याच्या मित्रात पत्रकारात महारुद्र मंगनाले आघाडीवर होते. अलीकडे शरद कारखानीससारखे अनुभवी पत्रकार सहकार्य करू लागले... आज संजय, अतुल सारखे नव्या दमाचे पत्रकार पुढे आले.
२६ जानेवारी रोजी लोकशाहीच्या चौथ्या खाम्बाने काय करावे? याचा या ठिकाणी वस्तुपाठ मिळाला.
पहिले पाउल..
पत्रकार आले. चांगले चांगले बोलले. सुंदर विचार मांडले आणि निघून गेले. एवढेच झाले असते तर त्याचे फारसे कौतुक करण्याचे कारण नव्हते. या पत्रकारानी एक पाउल पुढे टाकले म्हणून ते अभिनंदनास पात्र आहेत.
या आश्रमातील एका मुलाचा महिना खर्च १५०० रुपये आहे. १५०० रुपये महिना नियमित देणा-यास पालक म्हटले जाते. या पत्रकारापैकी चौघांनी पालकत्व पत्करले. संजय आवटे (कृषीवल), अनिल पौलकर (दिव्य मराठी) गाथाची आई स्मिता (मिळून सा-या जणी ) आणि सचिन चौधरी (छायाचित्रकार) या चौघांनी ही जबाबदारी घेतली. दर २६ जानेवारी रोजी सेवालायात जमायचे. पत्रकारांची कार्यशाळा घ्यायची आणि सामाजिक जाणीव ठेवून लेखन केलेल्या पत्रकाराना पुरस्कार द्यायचा, असे निर्णय करण्यात आले. पुरस्काराच्या भानगडीत न पडता पत्रकारानी या कामाशी लोकाना जोडून देण्याचे काम केले तर ते हवे आहे. त्याही पेक्षा या कामातून जे प्रश्न निर्माण होतात त्या विषयी समाजाचे प्रभावी प्रबोधन करण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे.
चार पत्रकारांनी जबाबदारी स्वीकारून कामाची सुरुवात केली आहे. या ता-यांच्या प्रकाशाने सारे आसमंत उजळो ही शुभेछा
Amar Habib (Senior Reporter)